Ad will apear here
Next
‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग घरबांधणी, घरदुरुस्ती अधिसूचनेत दुरुस्ती’
ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्याकडून आढावा


मुंबई : ‘रत्नागिरी, सिंधुदुर्ग घरबांधणी, घरदुरुस्ती अधिसूचनेमध्ये २०१५पूर्वी बांधकाम परवानगी देण्यासाठी जे नियम व अटी प्रचलित होते तेच पुन्हा लागू करण्यासाठी अधिसूचनेमध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव तयार करा,’ अशा सूचना ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी अधिकाऱ्यांनी दिल्या.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग घरबांधणी, घरदुरुस्ती अधिसूचनेमध्ये आवश्यक बदल करण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार वैभव नाईक, सदानंद चव्हाण, राजन साळवी त्याचबरोबर महसूल व वन, नगर विकास व ग्राम विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) हे उपस्थित होते.



‘२०१५ पूर्वीच्या नियम व अटी पुन्हा लागू केल्यास कार्यपद्धतीत अधिक सुलभता येईल व बांधकाम परवानगी देणे ग्रामपंचायतींना सोयीचे होईल,’ असे भुसे यांनी सांगितले. हा बदल संबंधित विभागाच्या प्रधान सचिवांशी चर्चा करून त्वरित करण्याची सूचनाही त्यांनी या वेळी केली.

‘नागरिकांना मुलभूत सुविधा व पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी, तसेच संबंधित क्षेत्राचा विकास करण्यासाठी आकारण्यात येणारा विकास शुल्क हा ग्रामपंचायतींकडून घर बांधणी क्षेत्रावर आकारण्यात येईल. हे शुल्क संपूर्ण महाराष्ट्रात आकारण्यात येत असून, बांधकाम परवानगीतून प्राप्त होणारी रक्कम ही केवळ मुलभूत सुविधा व पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी व फक्त विकास कामे करण्यासाठी वापरणे बंधनकारक आहे,’ असे ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZSGBX
Similar Posts
‘कोकणातील शिक्षक भरतीत स्थानिकांनाच सामावून घ्या’ मुंबई : ‘सन २०१०ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पूर्वीप्रमाणे भरती प्रक्रिया होऊन ७० टक्के स्थानिकांना सामावून घेण्याबाबत धोरणात्मक निर्णय करून कोकणातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना न्याय द्यावा,’ अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे २६ जून रोजी विधानसभेत केली.
तावडे अतिथी भवनाचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : आडीवरे (ता. राजापूर) येथे नव्याने बांधलेल्या तावडे अतिथी भवनाचे उद्घाटन माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते १० मे रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
‘कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे’ मुंबई : ‘स्वतंत्र विद्यापीठासाठी कोकणातील सर्व महाविद्यालये सकारात्मक असून, शिक्षणप्रेमींकडूनही स्वतंत्र विद्यापीठाच्या मागणीला मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत आहे. त्यामुळे सोलापूर, नांदेड, गडचिरोली, जळगावच्या धर्तीवर मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी शासनाने
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महिला मतदार सर्वाधिक मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वांत मोठा मतदार संघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language